| |

ताप कमी व पोट साफ करण्यासाठी तांदुळजाचा आहारात करा समावेश; ‘हे’ आहेत गुणकारी फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : तांदुळजा ही भारतात उगवणारी एक भाजी तसेच आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. शरीरात सी जीवनसत्व साठी तांदुळजा ची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शितविर्य आहे.  उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पाथारी वाढणे या विकारांत पथ्यकर म्हणुन जरूर वापरावी, महारोग, त्वचेचे समस्त विकार या मध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदुळजा फार उपयुक्त आहे.

नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती करिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे डोळ्याच्या विकारांत आग होणे, पाणी येणे, डोळे चिकटने या तक्रारी करिता फार उपयुक्त आहे. नियमित सेवनाने डोळे तेजस्वी होतात जुनाट मलावरोध विकारात आतड्यात चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला सुरवात होते.  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी असते. तांदुळजा या भाजीला काही ठिकाणी चवळई वा चवळीची भाजी असेही म्हणतात. मात्र चवळी या कडधान्याशी तिचा काही संबंध नसतो. औषधातही तांदुळजा ही भाजी बऱ्याच प्रमाणात वापरली जाते. तांदुळजा बाराही महिने उगवता येते. हिची पाने लहान लहान असतात आणि उंचीने ती दोन-तीन वीत इतकीच वाढते. तांदुळजा पचायला हलका, वीर्याने थंड व रुचकर असतो. पित्तदोष, कफदोष व रक्तदोषात हितकर असतो, मलमूत्रप्रवर्तनास मदत करतो, अग्नी प्रदीप्त करतो व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विषाचा नाश करतो. तांदुळजा ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारा आहे. तसेच अग्नी प्रदीप्त करणाराही आहे. त्यामुळे ताप आलेला असताना तांदुळजाची भाजी खाण्याने ताप कमी होतो, भूक सुधारते, तोंडाला चव येण्यास मदत मिळते.तांदुळजा सारक म्हणजे पोट साफ होण्यास मदत करणारा आणि अतिसारनाशक म्हणजे जुलाब हो असल्यास थांबवणारा असतो. थोडक्यात पोट साफ व्हावे त्यासाठी तांदुळजाची भाजी उत्तम होय.

तांदुळजाचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ती विषाचा नाश करण्यात श्रेष्ठ आहे. कोणतेही सौम्य विष पोटात गेले तर तांदुळजाची भाजी खाणे हितावह असते. सध्या हवेतील प्रदूषण, पाण्यातील दोष यामुळे शरीरात जाणाऱ्या विषतत्त्वांचा वेळीच निचरा होण्यासाठी तांदुळजा आहारात समाविष्ट करणे किंवा तांदुळजाच्या पानांचा रस काढून तो तुपासह घेणे चांगले असते. तांदुळजा लघवी साफ होण्यास मदत करणारी आहे. लघवी कमी होत असली किंवा अडखळत  असली तर तांदुळजाची भाजी-भाकरी खाण्याचा किंवा तांदुळजा भाजीचे सूप करून त्यात धण्याची पूड मिसळूत घेण्याचा उपयोग होतो. भाजल्यामुळे जखम झाली असेल तर त्यावर तांदुळजाचा रस नुसता लावण्याचा किंवा तांदुळजाच्या रसात हळकुंड उगाळून लावण्याचा उपयोग होतो. यामुळे दाह शांत होतो, तसेच जखम लवकर भरून येते. तांदुळजाचे मूळ गर्भाशयावर औषधाप्रमाणे उपयोगी असते. विशेषतः गर्भाशयातील उष्णता कमी होण्यासाठी तांदुळजाचे मूळ तांदुळजाच्या धुवणात उगाळून तयार केलेली पेस्ट रोज एक चमचा या प्रमाणात घेण्याचा उत्तम फायदा होतो. मासिक पाळी अलीकडे येणे, अंगावरून जास्त प्रमाणात व जास्त दिवस जाणे, अधून मधून काळपट जाणे या सर्व तक्रारींवरही ही पेस्ट घेणे हितावह असते. यामध्ये पुढील घटक असतात.

प्रथिने – ४.0 टक्के

कॅल्शियम- ३९७ मि.ली. ग्रॅम

फॉस्फरस- ८३ मि.ली. ग्रॅम

लोह- ५.५५ मि.ली. ग्रॅम

‘क’ जीवनसत्व- ९९ मि.ली. ग्रॅम

गर्भारपणात रक्तस्त्राव होतो त्यावरही तांदुळजाचे मूळ वाटून तयार केलेली चटणी एक-एक चमचा प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा घेता येते. विषारी प्राणी चावला असता त्याचे विष शरीराबाहेर निघून जावे यासाठी तांदुळजा उपयोगी असतो. म्हणून विंचू, उंदीर, गांधीलमाशी, मधमाशी वगैरेंच्या दंशावर तांदुळजाच्या मुळाची रस काढून तो तूप-साखरेसह काही दिवस घेणे चांगले असते. या दरम्यान अधून मधून तांदुळजाची भाजी. आहारात होणे हे सुद्धा चांगले. तांदुळजाची भाजी थंड असते त्यामुळे हातापायांची जळजळ, लघवीला दाह, डोळे लाल होणे वगैरे तक्रारींवर तांदुळजाचा दोन-तीन चमचे रस, खडीसाखर व तूप मिसळून घेण्याचा उपयोग होतो.

अंगावर पित्ताच्या गांधी उठत असल्या, पित्तामुळे पुळ्या येत असल्या, खाज येत असली तर त्यावर मसुराचे पीठ, ज्येष्ठमध, अनंतमूळ, वाळा यापैकी मिळतील ती द्रव्ये समभाग एकत्र करून ठेवावीत. स्नानाच्या वेळी मिश्रणातील दोन चमचे चूर्ण तांदुळजाच्या रसात मिसळावे व साबणाच्या ऐवजी वापरावे.

अँटिबायॉटिक, स्टिरॉइडस्, वेदनाशामक गोळ्या घेण्याची गरज न पडणे सर्वोत्तम, मात्र काही अपरिहार्य कारणाने अशी तीव्र औषधे घ्यावी लागली असतील तर ती घेताना तांदुळजाच्या भाजीचा आहारात समावेश करणे आणि औषध घेऊन झाल्यावर रोज दोन-तीन चमचे प्रमाणात तांदुळजाच्या पानांचा रस त्यात खडीसाखर मिसळून घेणे उत्तम होय. जितके दिवस औषधे घेतली असतील त्याच्या दुप्पट दिवसांपर्यंत हा रस घेणे चांगले होय.  तुपामध्ये जिरे घालून त्यात कापलेली भाजी परतून वरून सैंधव, मिरे, आले वगैरे घालून भाजी केल्यास यातील गुणधर्म द्विगुणित होतात.