Which Perfume is Best

आपल्या शरीरासाठी वापरा फूड परफ्युम

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।   उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला खूप जास्त प्रमाणात घाम हा येतो. त्या घामाची दुर्गंधी हि आपल्या शरीराला लागते. त्यामुळे आपल्या शरीराला खूप घाण वास हा येतो. अश्या वेळी जर आपल्याला चार लोकांच्यात जायचे असेल तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वात लगेच फरक हा जास्त  जाणवू शकतो. त्यामुळे जर आपण काही प्रमाणात अत्तर किंवा सुगंधी द्रव्ये वापरली तर आपल्या शरीराला घामाचा वास हा काही येणार नाही . आला तरी त्याचे प्रमाण हे जास्त असणार नाही.

फुलांचे अत्तर—–

फुलांपासून तयार करण्यात आलेले अत्तर महिलांसाठी खास असतात. या प्रकारातील सुगंधी परफ्यूम महिलांना दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. दिवसभर त्याचा मंद सुगंध दिवसभर तुम्हाला आनंदी ठेवेल. फुलांचे अत्तर हे जास्त काळ टिकते. फळांपासून तयार केले जाणारे अत्तर हे सुद्धा इतकेच आपल्या शरीराला फायदेशीर असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वात जास्त प्रमाणात हा अत्तर टिकून राहू शकतो.

—- रोजमेरी, लॅव्हेंडर, क्युमिन कापूर आणि अन्य वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले परफ्यूम मंद सुगंध देतात. रसाळ आणि चटकमटक स्वरूपात त्यांची पॅकिंग केली जाते.

— वुडी अत्तर भडक नसतात. त्यामुळे त्यांचा सुगंध डोकेदुखीदायक ठरत नाही. रसाळ फळांपासून त्याची निर्मिती करण्यात येत असल्याने दुसऱ्यांनाही त्याचा सुगंध सुखद अनुभव देणारा ठरतो.

—- ज्यांना परफ्यूमच्या बाबतीत जास्त प्रयोग करण्याची इच्छा नसते त्यांच्यासाठी ऑरेंजी सुगंध देणारा परफ्यूम उत्तम पर्याय ठरू शकतो.

— तुमच्या त्वचेला ज्या प्रकारचे अत्तर लावले जाते त्या अत्तरचा तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात त्रास हा होऊ शकतो.

— तुम्हाला कोणताही परफ्यूम लावायचा असेल तर तो त्याचवेळी लावा जर तुमची त्वचा कोरडी असेल. तुमची त्वचा पूर्णपणे कोरडी असेल तर त्यावर मॉइश्चरायजर लावावे. कोरडी त्वचा कोणतेही सुगंधी द्रव्य पूर्णपणे शोषून घेते. त्यामुळे त्याचा मंद दरवळणारा सुगंध पूर्ण दिवसभर मूड फ्रेश करत राहतो.

— बऱ्याच वेळा आपण घरातून जाताना फ्रेश होऊन जात असतो. पण घरात येताना तुम्ही खराब झालेला असतो.