| |

‘आमवात’ म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ‘आमवात’ म्हणजे आम व वात दोषांमुळे होणारी सांधेदुखी. आम वाढवणारी व वात वाढविणारी विविध कारणे असतात. पण मुख्य म्हणजे हि करणे आपल्या दैनंदीच दिन्चार्येशी संबंध राखतात. कारण दिवसभरात आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या आंतरिक क्रियांवर होत असतो. आपण सेवन केलेल्या आहारावर जठराग्नीची प्रक्रिया होते आणि त्यातून प्राकृत आहाररस तयार होतो. परंतु यातून अग्निमांद्य निर्माण झाल्यास तयार होणारा आहाररस पक्व स्वरूपात तयार न होता अपक्व स्वरूपात तयार होतो व आमनिर्मिती होते. हा आमवात ना धड शक्तीरुपी ना मलमार्गाने विसर्जन होणार असतो.

जड, चिकट, बुळबुळीत, तारयुक्त, दुर्गंधी, द्रव स्वरूपाचा आम हा आपल्या शरीरातील अनेक आजारांना निमंत्रण देतो. उदा. सांध्यांमध्ये आम पोहोचल्यास आमवात (सांधेदुखी) होतो. आमवाताच्या रूग्णांमध्ये सकाळी सांधे जखडणे ही मुख्य तक्रार दिसून येते. यासाठी सांध्यांचे सूक्ष्म व्यायाम करणे फायद्याचे ठरते. तसेच आम रक्तामध्ये साठला तर रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये गेला तर त्यांच्यात अवरोध निर्माण होतो. परिणामी हृदयविकार, फुफ्फुसांमध्ये फायब्रॉसिससारखे आजार होतात. म्हणून आमदोषाची लक्षणे दिसली तर लगेच उपाय करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात आमवाताची प्रमुख करणे आणि उपाय:-

० आमवाताची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे :-
१) अग्निमांद्य – पचनशक्ती मंदावणे.
२) अयोग्य व अवेळी आहाराचे सेवन.
३) अभिष्यंदी (दोषप्रकोपक) आहार. उदा – दही, आंबवलेले पदार्थ.
४) व्यायामाचा अभाव.
५) अति उपवास करणे.
६) शिळे अन्न खाणे.
७) यावेळी झोपणे.
८) रात्री अति प्रमाणात जागरण करणे.

० आमवातावर घरगुती उपाय खालीलप्रमाणे :-
१) सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊ नये. तहान असल्यास कमी प्रमाणात कोमट पाणी प्या.
२) दररोज कोमट पाण्यात १ चमचा सुंठ पावडर मिसळून त्याचा तयार काढा प्या. यामुळे सांध्यातील सूज कमी होते.
३) आमवात टाळण्यासाठी सकाळी नाश्त्यात सूप, लाह्यांचा चिवडा, राजगिरा लाडू किंवा फळांचा समावेश करा.
४) रात्री हलका आहाराचे सेवन करावेत. एरंड तेल घातलेली ज्वारी किंवा नाचणीची भाकरी व वेलींच्या भाज्यांचा आहारात समावेश असावा.
५) जखडलेल्या सांध्यांना तेलाचा मसाज करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
६) दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे टाळा.
७) आमवात ऑटोइम्युन आजार आहे. यामुळे शरीरात बाधक घटक तयार होतात. जे सांध्यासाठी घातक असतात. यासाठी प्राणायाम करणे फायदेशीर आहे.
८) आमवातातील रक्तकणांची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज डाळिंब, अंजीर, काळे मनुके आणि खजूर खा.
९) आंवतापासून आराम हवा असेल तर थंडपेय किंवा अन्नपदार्थांचे सेवन प्रामुख्याने टाळा.
१०) मानसिक ताण-तणावामुळे वात वाढतो आणि आमवात बळावतो. यासाठी उत्तम पर्याय म्हणजे ध्यानधारणा करा.